Tuesday, November 9, 2021

शेवगा शेती नियोजन





 नमस्कार मित्रांनो,



पाऊस उशिरा गेल्यामुळे शेवगा शेतीत फुलोरा व सेटिंग उशिरा होताना दिसत आहे.


ज्या ठिकाणी मागील 1 महिन्यापासून पाऊस संपलेला आहे, त्या ठिकाणी चांगला फुलोरा व सुतळी च्या आकाराच्या शेंगा लागलेल्या दिसत असतील, पण हे सेटिंग पूर्ण प्लॉट मध्ये नसून काही तुरळक झाडांना दिसून येत असेल..


आता काही महत्वाच्या गोष्टी करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपण व्यवसायिक उत्पन्न घेऊ शकू..


 

*महत्वाचे 7 मुद्दे खलील प्रमाणे..*

(एक महिन्याचे नियोजन)



• सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याचा ताण देणे.

यावर आपल्या ThinkingmindRJ या युट्युब चॅनल वर यासंदर्भात व्हिडीओ देखील आहे.

- हलकी जमीन असेल तर 5-6 दिवसांचा ताण आवश्यक आहे.

- भारी जमीन असेल तर 10-15 दिवसांचा ताण देऊ शकता.


• दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे खत नियोजन..

- झाडांना काहीच फुले नसतील तर एकदा 12:61:00 हे 5 किलो किंवा 7 किलो एकरी देणे,(ड्रीप द्वारे किंवा आळवणी करणे)

- त्यानंतर 8 दिवसांनी 00:52:34 हे खत 5 ते 7 किलो एकरी देणे.

00:52:34 हे खत 8 दिवसाच्या अंतराने 3 कमीत कमी तीन वेळा देणे गरजेचे आहे.


• तिसरा मुद्दा.. जेव्हा 00:52:34 हे खत द्याल, त्याच्या तिसऱ्या दिवशी Nitrobenzene (Boomflower) ची फवारणी करणे (2 वेळा) प्रमाण - 2 मिली प्रति लिटर.


• चौथा मुद्दा.. प्लॉट मध्ये काहीच फुले नसतील तरच शेंडा छाटणी करावी, अंदाजे 4 इंच शेंडा खुडवा. फुलोरा असेल तर शेंडा छाटणी करू नये. कारण शेंड्याजवळच कळ्यांचे मणी सारखे तुरे लागलेले असणार आहेत.


• पाचवा मुद्दा.. सध्या थंडीचे वातावरण आहे, त्यामुळे 10 ते 15 दिवसाच्या अंतराने कीटकनाशक + बुरशीनाशक यांची फवारणी करावी, जेणेकरून संभाव्य बुरशीजन्य रोग व अळीचा प्रादुर्भाव आपण रोखू शकतो.


• सहावा मुद्दा.. ड्रीप द्वारे किंवा आळवणी ने दिल्या जाणाऱ्या खतांसोबत TMT-Allrounder दिल्यास उत्तम परिणाम दिसून येतो असा अनुभव आहे, TMT-Allrounder मुळे फुले जास्त येऊन फुलगळ कमी होते, तसेच सेटिंग होण्यास मदत होते. शेंगांची क्वालिटी उत्तम बनते.

(TMT- All-rounder साठी..

रवींद्र जावके - 7387655897 किंवा

 नितीन कोटमे - 9403696714 

यांना कॉल करू शकता.)


• सातवा मुद्दा.. 30% पेक्षा जास्त झाडास फुले लागल्यानंतर, नैसर्गिक परागीभवणासाठी मधमाश्यांना आकर्षित करणे गरजेचे ठरते.

त्यासाठी ताक+गूळ+विलायची याची फवारणी करावी.

प्रमाण - 15 लिटर पंपासाठी..

- अर्धा लिटर ताक

- 50 ग्राम गुळ

- 4 - 5 विलायची (पावडर करून पंपात टाकणे)


ही फवारणी आठवड्यातून एकदा असे 4 वेळा केल्यास, मधमाश्या प्लॉट मध्ये दिसून येतील.

काही मित्रांच्या शेतातच मधमाश्यांचे मोहोळ बसलेले दिसून आले आहे.😊



धन्यवाद.🙏



डॉ. रवींद्र जावके.

फोन - 7387655897

*(कॉल वेळ* - *दुपारी 3 ते 5 किंवा रात्री 9 ते 11)*

*Youtube Channel* - *ThinkingMindRJ*

*फेसबुक ग्रुप* - *" शेवगा शेती फक्त "*

Tuesday, September 29, 2020

सेंद्रिय शेती, सेंद्रिय खते

                    ● सेंद्रिय शेती, सेंद्रिय खते व फायदे ●

सेंद्रिय शेती. Organic Farming

हवा, माती, धान्याची रोपे, पशू, पक्षी, मनुष्यप्राणी व निसर्गचक्र यांचे आरोग्य वाढविणे व निसर्गचक्रात समतोल राखणे, हा सेंद्रिय शेतीचा महत्वाचा उद्देश आहे. 

सेंद्रिय शेती करताना कोणत्याही रासायनिक गोष्टीचा वापर न झाल्यामुळे मनुष्याचे तसेच जमिनीचे आरोग्यास पोषक राहण्यास मदत होते.

सेंद्रिय शेती ही निसर्गाच्या जीवनचक्रानुसार चालणारी अनुरूप शेती असल्यामुळे, जीवसृष्टीला कसलीही हानी न होता, सर्व प्रकारचे प्रदूषण होणे टाळता येते.


• प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते, त्याला सेंद्रिय खत असे म्हटले जाते.

Thinkingmindrj

• सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते खालील प्रमाणे:-


- शेणखत, 

- कंपोस्ट, 

- हिरवळीची खते, 

- गांडूळ खते, 

- माश्यांचे खत, 

- खाटिकखान्याचे खत, हाडांचे खत, 

- कोंबडी खत,

- लेंडी खत,

- तेलबियांची पेंड इत्यादी.


• शेणखत : 

- गाईचे / म्हशीचे शेण, मूत्र, तसेच गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हटले जाते.

- शेणखतामध्ये नत्र, स्फुरद व पालाश हे मुबलक प्रमाणात असते.

- शेणाचा महत्त्वाचा उपयोग बायोगॅसमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणून वापरता येते.


• कंपोस्ट खत :-

- शेतातील गवत, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, उसाचे पाचट, कापसाची धसकटे इ. सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्मजीवजंतूंमुळे विघटन होऊन त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट म्हणतात. यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश मुबलक प्रमाणात आढळते.


• हिरवळीची खते :- 

- हिरवळीचे खाते म्हणजे,  लवकर वाढणाऱ्या पिकांची निवड करून, त्यांची दाट पेरणी करून पीक फुलोऱ्यावर येण्याच्या आधी ते नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाढली जातात.

- त्यापासून जमिनीला नत्र मिळते, जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते. या पद्धतीने तयार केलेल्या खतांना हिरवळीचे खते असे संबोधले जाते.

- या गाडलेल्या पिकांना कुजण्य़ासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालवधी लागू शकतो.

- यामध्ये ताग, धैच्या, मूग, चवळी, गवार, शेवरी, बरसीम, ग्लीरिसिडीया तागापासून नत्राचा पुरवठा ५ ते ६ आठवड्यात चांगल्या प्रमाणात होतो.

- मुगाचा पालापाचोळा जमिनीत गाडल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ होताना दिसून येते.


• गांडूळ खत :- 

- ह्या खतात गांडुळाची विष्ठा, नैसर्गिकरीत्या कुजलेले पदार्थ, गांडुळाची अंडीपुंज, बाल्यावस्था आणि अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असतो, या खताला गांडूळ खत असे म्हणतात.


• माशाचे खत :- 

- समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून जे खत तयार होते ते. ह्यात नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण भरपूर असते.


• खाटीकखान्याचे खत :- 

- खाटीकखान्यात जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवितात त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात यात नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणत असते. 

● सेंद्रिय शेतीचे फायदे.

• जमिनीत सेंद्रिय खत टाकल्यास नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थांत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. शेणखताव्यतिरिक्त कोंबडी खत, रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात.

• मातीचा आरोग्य स्तर कायम ठेवण्यास मदत.

• शेतीवर अवलंबून असणार्‍या जीवांना, नैसर्गिक जीवन जगण्याचा हक्क हा सेंद्रिय शेतीमुळे मिळतो.

• सेंद्रिय शेतीमुळे अन्न सुरक्षेची खात्री व जीवनमान उंचावण्यास मदत होते.

• आर्थिक उत्पनात वाढ व खर्चात घट होते, त्यामुळे शेतीचे आर्थिक नियोजन हे योग्यरितीने होते.

• जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते.

• वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास, जमिनीची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते.


• सेंद्रिय खतांमुळे झाडांना विविध अवस्थेत नैसर्गिक नत्र, स्फुरद व पालाश उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांद्वारे उत्तम प्रकारे शोषले जाते.

• जमिनीचा सामुचा समतोल राखला जातो.

• सेंद्रिय खतांच्या नियमित वापरामुळे, मातीवर नैसर्गिक आच्छादन तयार होते, त्याची सावली होऊन तापमान वाढत नाही.

• कर्ब किंवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने, जमिनीतील असंख्य जिवाणूंना त्याचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी होतो, व हे जिवाणू जमीनीतून अन्नद्रव्य झाडांना सहजतेने उपलब्ध करुन देतात.


• सेंद्रिय शेती करताना, वनस्पतींपासून विविध निविष्ठा तयार करून त्या किटनाशकाचा स्वरूपात वापरता येतात. तसेच हानिकारक कीटकांना शेतीपासून दूर ठेवण्यास मदत होते.

• निम तेल, गोमुत्र, करंज तेल, लसूण तेल इत्यादी घटकांपासून सौम्य ते तीव्र प्रकारचे किटनाशक तयार करता येऊ शकते.

• तसेच पक्षी थांबे,  चिकट सापळे, कामगंध सापळे,  प्रकाश सापळे वापरून होणार संभाव्य प्रादुर्भाव रासायनिक घटक न वापरता, टाळता येऊ शकतो.


धन्यवाद.

Team ThinkingMindRJ.

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w

Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share


Monday, September 28, 2020

सेंद्रिय किटनाशक

                     ● सेंद्रिय किटनाशक ●

सेंद्रिय किटनाशक


पाने खाणारी, पाने गुंडाळणारी अळी, तसेच मावा यासाठी प्रभावी  सेंद्रिय किटनाशक.

शेवग्यावर पडणाऱ्या महत्वाच्या अळ्या म्हणजे पाने गुंडाळणारी व पाने खाणारी अळी होय.

या अळीच्या नियंत्रणासाठी विविध रासायनिक किटनाशक बाजारात उपलब्ध आहेत. या रासायनिक किटनाशकाच्या वापरामुळे खर्चात वाढ होतेच तसेच बऱ्याचवेळा यांचे प्रमाण जास्त झाल्यास पानगळ देखील होताना दिसून येते. अश्यावेळी सेंद्रिय पद्धतीने, घरच्याघरी तयार केलेले किटनाशक हा एक प्रभावी पर्याय ठरु शकतो. यामुळे खर्च कमी होतो, व झाडास इजा होत नाही, मधमाशी दूर जात नाही असे अनेक फायदे होतात.

पाने खाणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी यांच्यावर वेळेतच नियंत्रण मिळविणे गरजेचे असते, करण यामुळे झाडाच्या सर्वांगीण वाढीवर परिणाम होऊ शकतो. 

जे शेतकरी सेंद्रिय शेती करतात त्यांना याची नक्कीच माहिती असेल, असे अनेक शेतकरी असतात जे सेंद्रिय व रासायनिक शेती म्हणजे मिश्र प्रकारची शेती करून वेळोवेळी शेतीत होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवतात. त्यांनी या किटनाशकाच्या शेतीत नक्कीच वापर करावा.

Thinkingmindrj

 ● या किटनाशकासाठी लागणारी सामग्री ●


• तंबाखू

• हिरवी मिरची

• लसूण

• निम अर्क

• गोमूत्र

• पाणी.


 ● वरील सामग्रीचे प्रमाण. ●


• तंबाखू - 250 ग्रॅम.

• हिरवी मिरची - 500 ग्रॅम.

• लसूण - 250 ग्रॅम.

 • नीम अर्क  - 200 मिली.

• गोमूत्र - 2 लिटर.

 • पाणी - 2 लिटर.


● सेंद्रिय किटनाशक बनविण्याची प्रक्रिया ●


- प्रथम 2 लिटर पाणी आणि 2 लिटर गोमूत्र एकत्रित करून, चांगले ढवळून घ्यावे. 

- त्यानंतर, हिरवी मिरची व लसूण  हे बारीक ठेचून घ्यावे. वरवंट्यावर किंवा मिक्सर याचा वापर केला तरी चालेल.

- यानंतर वरील पाणी आणि गोमूत्राच्या 4 लिटर मिश्रणापैकी 3 लिटर पाणी-गोमूत्र मिश्रण घेऊन त्यात हिरवी मिरची व लसूण याची पेस्ट टाकावी व हे सर्व शेगडीवर किंवा चुलीवर 10 मिनिटे चांगले उकळून घ्यावे. मिरची आणि लसणाचा अर्क या पाणी+ गोमूत्रामध्ये चांगला उतरू द्यावा. 

- यानंतर, उरलेले 1 लिटर, गोमूत्र+ पाणी मिश्रणात तंबाखू टाकून, हे मिश्रण देखील 10 मिनिटे चांगले उकळून घ्यावे.

- नंतर वरील दोन्ही मिश्रण थंड होऊ द्यावे. जेणेकरून यात टाकलेल्या घटकांचा चांगला अर्क उतरेल.

- वरील दोन्ही मिश्रण थंड झाल्यावर एकत्रित करून चांगले ढवळून घ्यावे.

- आता ह्या ढवळलेल्या मिश्रणात, 200 मिली. नीम अर्क टाकावे व पुन्हा हे सर्व मिश्रण चांगले ढवळून घ्यावे.

• वरील सर्व प्रक्रिया झाल्यावर आपले किटनाशक तयार होईल, हे अंदाजे 3 लिटर मिश्रण तयार होऊ शकते.


● सेंद्रिय किटनाशक वापरण्याची पद्धत ●

- वरील तयार केलेले सेंद्रिय किटनाशक हे फावरणीसाठीच वापरावे.

- सेंद्रिय किटनाशक 15 लिटरच्या टाकी साठी 150 मिली या प्रमाणात घ्यावे.

- याची फवारणी करताना तोंडाला रुमाल बांधावा, पूर्ण बाहीचा शर्ट घालावा, तसेच डोळ्यावर गॉगल लावावा.

- ही फवारणी शक्यतो संध्याकाळच्या वेळेस घ्यावी, जेणेकरून याचा चांगला परिणाम आपणास पहावयास मिळेल.

- शेवग्यामध्ये हे सेंद्रिय किटनाशक मावा, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, कोळी, लाल कोळी यावर प्रभावीपणे वापरता येते. तसेच अंडीनाशक म्हणून देखील या सेंद्रिय किटनाशकाच्या वापर करता येतो.


• हे किटनाशक तयार केल्यावर लागलीच वापरले असता उत्तम परिणाम दिसून येतो. 

• शेतीवरील खर्च कमी होतो, रासायनिक किटनाशकामुळे होणारे दुष्परिणाम होत नाहीत. हे किटनाशक पूर्णतः सेंद्रिय असल्यामुळे याचे कसलेच साईड इफेक्ट शेवगा झाडावर होत नाहीत.


धन्यवाद.

Team ThinkingMindRJ.

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w

Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share


Tuesday, September 22, 2020

वर्मीवाॅश / गांढुळपाणी शेतीतील फायदे

 ● वर्मीवाॅश / गांढुळपाणी शेतीतील फायदे ● 

Wormiwash / गांढुळपाणी


सेंद्रिय शेवगा शेती मध्ये गांढुळ पाण्याचे विशेष महत्व आहे.

• गांडूळ च्या शरीरातून नेहमी एक स्त्राव स्रवत असतो. 

• या स्त्रावला " Coelomic Fluid " असे म्हणतात. " कोलॅमिक फ्लूड " नावाचा पिवळसर स्त्राव हा गांढुळासाठी वंगणाचे काम करत असतो.

• या स्त्रवामुळे गांडूळाच्या शाररिक हालचाली, श्वासोच्छ्वास व इतर प्रक्रिया सुलभ होतात. 


• कोलॅमिकच्या स्त्रावात बुरशीनाशक गुणधर्म तर  असतातच, याशिवाय

- नत्र-1.32%,

- स्फुरद-0.72%,

-पालाश-0.65% 

आणि नैसर्गिक सूक्ष्म अन्नद्रव्येसुद्धा असतात. 

गांडूळपाण्यात काही संप्रेरके देखील असल्याचे काही अभ्यासात दिसून आलेले आहे.

• गांडूळपाणी हे पिकांना फवारणीद्वारे किंवा जमिनीतून सुध्दा देता येते.

• व्हमीरवाॅशची फवारणी घेत असाल तर, दोन फवारणी मधील अंतर हे कमीतकमी 12 दिवसांचे ठेवावे. 

शेवग्यामध्ये व्हमीरवाॅशची फवारणी ही झाडाच्या वाढीच्या अवस्थेत, फुलोरा अवस्थेत तसेच फळधारणा अवस्थेत ही घेऊ शकता.म्हणजेच शेवगा बागेच्या सर्व अवस्थेमध्ये गांढुळपाणी वापरता येते, याच्या वापराचे कसलेही दुष्परिणाम शेवगा झाडावर होत नाहीत.

Thinkingmindrj

● गांढुळपाण्याचे शेवगा शेतीत होणारे फायदे खालीप्रमाणे.


• झाडावरील बुरशी नाहीशी होते.

• जमिनीतून दिल्यास, पांढ-या मुळ्यांची संख्या वाढवण्यास मदत करते.

• नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्मअन्नद्वव्ये नैसर उपलब्ध स्वरुपात व सूक्ष्म अन्नद्वव्ये उपलब्ध स्वरुपात असल्यामुळे झाडाची सर्वांगीण वाढ होण्यास मदत होते.

• नवीन फुटवे फुटण्यास तसेच जास्त कळी निघण्यास मदत होते.

• पानांचा रंग हिरवा राखून, पानगळ कमी करण्यास मदत करते.

• फळधारणा अवस्थेत गांढुळपाण्याची फवारणी नियमित घेत राहिल्यास, शेंगावरील बुरशी नाहीशी होते, शेंगांचा रंग हिरवागार होतो, तसेच शेंगावरील तंबूसपणा नाहीसा होतो.

• परिणामी उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होते, शेंगांची प्रत सुधारते.

• झाड निरोगी राहते, मुळांची अन्नद्रव्ये शोषण्याची क्षमता वाढते.

• त्यामुळे, गांढुळ खतासोबतच, गांढुळ पाण्याचाही वापर हा सातत्याने करावा, जेणेकरून खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होईल. 

• शेतकरी शेतातच गांढुळपाणी तयार करू शकतात, गांढुळ पालनासाठी बेड मिळतात, त्यात छोट्या प्रमाणावर गांढुळखत व गांढुळपाणी अत्यल्प खर्चात तयार करता येऊ शकते.


गांढुळपाणी वापरण्याचे प्रमाण


• प्रति एकर जमिनीतून देण्यासाठी..

200 लिटर पाण्यात - 50 लिटर गांढुळपाणी.

• फवारणी साठी..

• 15 लिटर पंपाला - 100 मिली गांढुळपाणी.


• गांढुळपाण्याच्या नेहमीच्या वापराने, रासायनिक खतांचा वापर कमी होतो, झाडे निरोगी राहतात, खर्च कमी होती, परिणामी उत्पन्नात वाढ होते.


धन्यवाद.

Team ThinkingMindRJ.

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w

Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share

Saturday, September 19, 2020

फळमाशी व उपाययोजना

 ● फळमाशी व उपाययोजना. ●

फळमाशी


शेवगा शेंगांवरिल फळमाशी ही, शेंगांचे जवळपास 60 ते 70 टक्क्यांपर्यंत नुकसान करण्याची क्षमता असलेली किड.

• फलमशीच्या प्रादुर्भावामुळे शेंगा बाद होतात, शेंगा वाकड्या होतात, तसेच शेंगातून चिकट फेस येतो. अश्या शेंगा बाजारात नेता येत नाहीत.

• फळमाशीने डंख मारलेल्या ठिकाणचा भाग हा तपकिरी रंगाचा, कुजल्यासारखा दिसतो, व त्यातून बऱ्याच वेळा चिकट द्रव स्त्रावताना दिसते.

• फळमाशी शक्यतो पावसाळ्यात व हिवाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते.

• फलमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात एकरी कमीतकमी 2 प्रकाश सापळे लावलेत. 

• शेतात मक्षिगंध सापळे देखील लावले जातात, पण काही ठिकाणे मक्षिगंध सापळे लावले असता, फळमाशी जास्त प्रमाणात आलेली दिसून आली आहे. मक्षिगंध सापळे हे शेतकऱ्याने त्यांचा मागील अनुभवानुसार लावावेत.

• फळमाशी येऊ नये म्हणून वारंवार निम तेलाची फवारणी घेत राहावी, जेणेकरून फळमाशी येणार नाही, तसेच इतर अळ्या, जसे पाने गुंडाळणारी आळी, पाने खाणारी आळी यांनाची दूर ठेवण्यास मदत होईल.

• एकदा फळमाशी आली की ती शेंगांचे नुकसान करते, व नंतर उपाययोजना केली जाते, पण तोपर्यंत बरेच नुकसान झालेले असते. त्यामुळे प्रतिबंधनात्मक उपाययोजना करणे चातुर्याचे ठरते.

• प्रकाश सापळे, मक्षिगंध सापळे व निम तेलाची किंवा निम अर्काची फवारणी ही प्रतिबंधनात्मक उपाय योजनेत वापरावे. पण जर फळमाशीचा प्रादुर्भाव शेवगा शेतात दिसत असेल तर, फळमाशीच्या नियंत्रणासाठी खलील उपाययोजना कराव्यात.


फळमाशीच्या नियंत्रणासाठी रासायनिक उपययोजना


 •  स्पिनोसॅड - ०.२ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी.

किंवा,

• डायक्लोरोव्हॉस-  ०.५ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी.

किंवा,

• मिथोमिल - १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी.

किंवा,

• थायमॅथॉक्झाम - ०.२ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी.

किंवा,

• इमामेक्टिन बेन्झोएट - ०.२५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी.

किंवा,

• डेल्टामेथ्रीन - ०.५ मिली  प्रति लिटर पाण्यातून फवारणी घेता येते.



धन्यवाद.


Team ThinkingMindRJ.

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w

Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share

Friday, September 18, 2020

पावसाळ्यातील शेवग्याची काळजी

 ● पावसाळ्यातील शेवग्याची काळजी


शेवगा लागवड करताना, पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करणे आवश्यक आहे.शेवगा पिकाला कमी पाणी असले तरी चालते, पण जास्त पाणी नको.

शेवगा शेती काळजी

• शेवगा झाडाची मूळे ही इतर झाडाच्या तुलनेत अत्यंत नाजूक असून, जास्त काळ पाणी मुळाजवळ राहिल्यात मूळे कुजतात, तसेच त्यांचे अन्नद्रवे शोषण्याच्या क्षमतेवर परिमाण होतो.

• पाणी धरून ठेवणारी जमीन, तसेच ज्या रानात पावसाळ्यात जास्त दिवस पाणी साचून राहते व पाणी बाहेर काढून देण्याचा काहीच पर्याय उपलब्ध नसतो, अश्या जमिनीत शक्यतो शेवगा लागवड करू नये.

• सतत धार पाऊस असल्यास किंवा रोज पाऊस पडत राहिल्यास, शेवग्याच्या मुळांजवळ बरेच दिवस ओलावा राहतो, अश्या अवस्थेत मुळांना बुरशी लागते, मूळकूज होते.

• मुळांना बुरशी लागल्यामुळे, पाने पिवळी पडणे तसेच पानगळ व फुलगळ होणे, असे प्रकार पहावयास मिळतात.

• मूळकूज जर जास्त प्रमाणात असेल तर झाडे सुकून जाऊन दगावू शकतात, अश्या अवस्थेत तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे ठरते.

ThinkingmindRJ

• सुरवातीला महाराष्ट्रात झालेली शेवगा लागवड ही दुष्काळी जिल्यात झालेली आहे व तेथे उत्पन्न देखील चांगले घेण्यात आलेले उदाहरणे आहेत.

• जास्त पर्जन्यमान असलेल्या जिल्ह्यात शेवगा शेतकरी मित्रांना तारेवरची कसरत करावी लागते, कारण आज हिरवा दिसणारा शेवगा प्लॉट , जास्त पावसामुळे उद्या पिवळा दिसू शकतो.

• पावसाळ्यात किंवा पावसाच्या अगोदर शक्यतो पंजा छाटणी करून घ्यावी, जेणेकरून पावसाच्या महिन्यात फुटवे फुटून त्यांचे फांदीत रूपांतर होईपर्यंत पावसाचा कालावधी निघून जातो. आणि नंतर फुलधारणा होऊन उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने नियोजन करता येते.

• पावसाळ्यात सर्वात जास्त होणारा प्रादुर्भाव म्हणजे बुरशीलागण होय.

• पावसाळ्यात बुरशी सोबतच, फळमाशी, मावा, खोडकीडा, हुमणी, पाने गुंडाळणारी तसेच पाने खाणारी आळी इत्यादी प्रादुर्भाव होताना दिसून येतात.


 ● पावसाळ्यात काय काळजी घ्यावी

• पावसाळ्यात सर्वात अगोदर घ्यावयाची काळजी म्हणजे शेतात पाणी जास्त काळ थांबू न देणे, म्हणजेच शेतात पाणी साचून राहत असेल तर ते बाहेर काढण्याची व्यवस्था करणे.

• पावसाळा चालू होण्याअगोदर बांधावरील लिंबाच्या झाडावर कीटकनाशकाची फवारणी करणे, जेणेकरून हुमणीचे नियंत्रण पतंग अवस्थेत करता येऊ शकते.

• पतंग अवस्थेतील कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी एकरी किमान 2 प्रकाश सापळे लावावेत.

शेवगा झाडाच्या खोडाजवळील तण काढून घ्यावे, जेणेकरून खोडकिड्याचा प्रादुर्भाव आटोक्यात येऊ शकतो.

• खोडाजवळ मातीचा भर द्यावा, झाडे लहान असतील तर वादळ पावसात झाडे कोलमडू शकतात.

• पावसाळा चालू झाल्यानंतर आठवड्यातून एकदा तरी बुरशीनाशक व हुमिक ऍसिड ड्रीपद्वारे द्यावे किंवा आळवणी करावी.

• तसेच स्पर्षजन्य बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी.

• जास्त पाऊस झाल्यामुळे मुख्य अन्नद्रव्ये व सुष्म अन्नद्रव्ये पाण्यासोबत खाली निघून जातात, त्यामुळे मुळांजवळ त्यांची कमतरता जाणवून, परिणामी झाडाची वाढ खुंटुन पाने पिवळी पडतात व गळून जातात.

• अश्या अवस्थेत, पाऊस काही दिवस जर थांबला असेल, तर सुष्मअन्नद्रव्ये (Micronutrients) व मुख्यअन्नद्रव्ये (NPK) ड्रीप द्वारे द्यावीत.

• नवीन लागवड असेल तर अश्या अवस्थेत झाडे जगविण्याकडे कल असावा. पाऊस थांबल्यानंतर झाडांची नैसर्गिक वाढ होत असते.

• पावसाळ्यात बरेच शेतकरी ड्रीपद्वारे आठवड्यातून एकदा, गोमुत्र , गूळ, गांढुळपाणी देतात, व याचा परिणाम देखील चांगला दिसून आलेला आहे.

• अधिक माहिती साठी ThinkingmindRJ या शेवगा शेतीवरील youtube channel ला भेट द्यावी.


धन्यवाद.

Team ThinkingMindRJ.

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w

Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share

Wednesday, September 16, 2020

शेवगा सेटिंग आणि मधमाशी.

              ● शेवगा सेटिंग आणि मधमाशी●

      🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝


सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टीन यांचे एक महत्वाचे वाक्य म्हणजे..

" ज्या वेळी मधमाशी या जगातून संपेल, त्या नंतर अवघ्या चार वर्षानंतर, मनुष्य जातीचे अस्तित्वच संपुष्टात येईल."

शेवगा आणि मधमाशी


• मधमाशीमुळे होणाऱ्या परागीभवणातून फळधारणा तर होतेच, याशिवाय फळाची प्रत ही सुधारते, तसेच फुलगळ होण्याचे प्रमाण कमी होते.

• पुष्प वनस्पतींना मधमाशीचा होणारा स्पर्श हा परिस स्पर्शापेक्षा कमी नाही, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

• यामुळेच मधमाशीला सामाजिक कीटक असे देखील म्हटले जाते. 

• मधमाशी अतिशय महत्वाचे काम करत असते, चिकाटी वृत्तीचा धडा मधमाशीपासून मानवाने घ्यावयास हवा. तसेच समूह काम म्हणजेच टीम वर्क, याचाही मधमाशी एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

• न थकता, अविरत श्रम करून मधासारखा अविनाशी पदार्थ निर्माण करत असते.

• पराग सिंचनामुळे शेती उत्पादनात वाढ होत असतेच, तसेच मध व मेण हे नैसर्गिक पदार्थ देखील मानवास उपलब्ध मधमाशी मुळे उपलब्ध होतात.

शेवगा शेतीत मधमाशीचे खूप महत्व आहे. शेवग्याच्या फुलांचा देठ हा नाजूक असल्याकारणाने ही फुले लवकर गळतात. पाऊस किंवा वादळात शेवग्याची असंख्य फुले गळताना दिसतात.

• अशी फुलगळ होण्याअगोदर जर या फुलांची सेटिंग झाली, म्हणजेच नर व मादी परागकणांचे मिलन होऊन शेंग निर्मिती झाली तर होणारे संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते.

• शेवग्याच्या फुलांचा रंग व गंध हा मधमाश्यांना लांबून आकर्षित करत असतो, फुले ही झुपक्याने लागत असल्यामुळे ती दुरूनच दिसतात.

• पाळीव किंवा जंगली मधमाश्या, तात्काळ शेवगा फुलांकडे आकर्षित होताना दिसून येतात.

• मधमाश्यांच्या उपस्थितीत शेंगधारणा ही जास्त प्रमाणात होते.

शेवगा उत्पादनात सुमारे २५ ते ३५% एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ होते.

Thinkingmindrj

मधमाश्यांच्या प्रजाती खलील काही प्रजाती आहेत,

- भारतीय माशी (ॲपिस सेरेना इंडिका)

- युरोपियन माशी (ॲपिस मेलिपेरा)

- आग्या माशी (ॲपिस डॉरसेटा)

- लहान माशी (ॲपिस फ्लोरिआ)

वरील मधमाश्यांपैकी 'भारतीय माशी' आणि 'युरोपियन माशी' पेटीत पाळता येतात.


• भारतीय माशी' आणि 'युरोपियन माशी' यांचे मधमाशी पालन करून रोजगार निर्मिती करता येते.

शेवगा शेतीला जोडधंदा म्हणुन मधमाशी पालन हा एक उत्तम व्यवसाय ठरू शकतो, यात शंका नाही.


मधमाशीपालनाचे मानवास होणारे फायदे


• अनेक पिकामध्ये मधमाश्यांद्वारे परागीकरण झाल्यामुळे उत्पादन वाढते.

• मध तर मिळतेच, सोबतच मेणाचेही उत्पादन मिळते. विविध सौंदर्यप्रसाधने, अनेक प्रकारची औषधे तयार करण्यासाठी मध आणि मेणाचा उपयोग केला जातो.

• मधमाशीपालन शेती, फळबाग, भाजीपाला लागवड व कोणत्याही पूरक उद्योगाशी स्पर्धा करत नाही.

• नैसर्गिक परागीभवणासाठी मधमाशी पेटी भाड्याने किंवा विकत देली जाते.

• पर्यावर्णकचे संतुलन राखल्याने समाधान मिळते. पौष्टिक अन्न खावयास मिळते.

• मधमाशी पालनासाठी आवश्यक तंत्रांचे प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. याच्या ट्रेनिंग महाराष्ट्रात विविध ठिकाणी होत असतात. प्रशिक्षण घेऊनच मधमाशी पालनाचा व्यवसाय करावा.


● मधमाशी वाचवणे आपले कर्तव्य आहे.●


• विषारी कीटक नाशकांच्या फवारण्या करू नये अथवा अपरिहार्यता असेल, तर अश्या फवारण्या संध्याकाळी कराव्यात.

• शेतातील अथवा बांधावरील, मधाची पोळी जाळून अथवा धूर देऊन काढू नये.

• मधमाशांनाउपयुक्त अश्या सपुष्प वनस्पतींची लागवड करणे. उदा. झेंडू इत्यादी.

• शेताच्या आजूबाजूला, मधमाश्यांची पोळे येण्यासाठी, मधमाशयांची अमिशांचा वापर जास्तीतजास्त करावा.


• परागीभवनामुळे लाभ होणाऱ्या भाज्या, फळे आणि फुले खालीलप्रमाणे,

• भाज्या - शेवगा, कांदा, कोबी, मुळा, दोडका, कारली, काकडी, भोपळा, गाजर इ.

• फळे - डाळिंब, संत्री, पेरू, स्ट्राँबेरी, काजू, नारळ, लिंबू इ.

• फुले - शेवंती, झेंडू, गलांडी,  इ.

• पिके - मोहरी, सूर्यफूल, बाजरी इ.


● पूर्ण मानव जातीवर, मधमाशीचे मोठे उपकार आहेत. मधा सारखे अमृत निर्माण करणाऱ्या या किटकाचे अस्तित्व दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. मधासाठी पोळी जाळणे,विषारी कीटक नाशके फवारणे, मोबाईल टोवर उभारणे,मधमाश्या विषयी असलेले अज्ञान पसरवणे, या सर्व कारणांमुळे एक उपयुक्त जीव संपण्याच्या मार्गावर आहे.यासाठी आपण सर्वाने मधमाशीचे संरक्षण करणे गरजेचे झाले आहे.


धन्यवाद.

Team ThinkingMindRJ.

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w

Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share

शेवगा शेती नियोजन

 नमस्कार मित्रांनो, पाऊस उशिरा गेल्यामुळे शेवगा शेतीत फुलोरा व सेटिंग उशिरा होताना दिसत आहे. ज्या ठिकाणी मागील 1 महिन्यापासून पाऊस संपलेला आ...