Friday, September 18, 2020

पावसाळ्यातील शेवग्याची काळजी

 ● पावसाळ्यातील शेवग्याची काळजी


शेवगा लागवड करताना, पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करणे आवश्यक आहे.शेवगा पिकाला कमी पाणी असले तरी चालते, पण जास्त पाणी नको.

शेवगा शेती काळजी

• शेवगा झाडाची मूळे ही इतर झाडाच्या तुलनेत अत्यंत नाजूक असून, जास्त काळ पाणी मुळाजवळ राहिल्यात मूळे कुजतात, तसेच त्यांचे अन्नद्रवे शोषण्याच्या क्षमतेवर परिमाण होतो.

• पाणी धरून ठेवणारी जमीन, तसेच ज्या रानात पावसाळ्यात जास्त दिवस पाणी साचून राहते व पाणी बाहेर काढून देण्याचा काहीच पर्याय उपलब्ध नसतो, अश्या जमिनीत शक्यतो शेवगा लागवड करू नये.

• सतत धार पाऊस असल्यास किंवा रोज पाऊस पडत राहिल्यास, शेवग्याच्या मुळांजवळ बरेच दिवस ओलावा राहतो, अश्या अवस्थेत मुळांना बुरशी लागते, मूळकूज होते.

• मुळांना बुरशी लागल्यामुळे, पाने पिवळी पडणे तसेच पानगळ व फुलगळ होणे, असे प्रकार पहावयास मिळतात.

• मूळकूज जर जास्त प्रमाणात असेल तर झाडे सुकून जाऊन दगावू शकतात, अश्या अवस्थेत तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे ठरते.

ThinkingmindRJ

• सुरवातीला महाराष्ट्रात झालेली शेवगा लागवड ही दुष्काळी जिल्यात झालेली आहे व तेथे उत्पन्न देखील चांगले घेण्यात आलेले उदाहरणे आहेत.

• जास्त पर्जन्यमान असलेल्या जिल्ह्यात शेवगा शेतकरी मित्रांना तारेवरची कसरत करावी लागते, कारण आज हिरवा दिसणारा शेवगा प्लॉट , जास्त पावसामुळे उद्या पिवळा दिसू शकतो.

• पावसाळ्यात किंवा पावसाच्या अगोदर शक्यतो पंजा छाटणी करून घ्यावी, जेणेकरून पावसाच्या महिन्यात फुटवे फुटून त्यांचे फांदीत रूपांतर होईपर्यंत पावसाचा कालावधी निघून जातो. आणि नंतर फुलधारणा होऊन उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने नियोजन करता येते.

• पावसाळ्यात सर्वात जास्त होणारा प्रादुर्भाव म्हणजे बुरशीलागण होय.

• पावसाळ्यात बुरशी सोबतच, फळमाशी, मावा, खोडकीडा, हुमणी, पाने गुंडाळणारी तसेच पाने खाणारी आळी इत्यादी प्रादुर्भाव होताना दिसून येतात.


 ● पावसाळ्यात काय काळजी घ्यावी

• पावसाळ्यात सर्वात अगोदर घ्यावयाची काळजी म्हणजे शेतात पाणी जास्त काळ थांबू न देणे, म्हणजेच शेतात पाणी साचून राहत असेल तर ते बाहेर काढण्याची व्यवस्था करणे.

• पावसाळा चालू होण्याअगोदर बांधावरील लिंबाच्या झाडावर कीटकनाशकाची फवारणी करणे, जेणेकरून हुमणीचे नियंत्रण पतंग अवस्थेत करता येऊ शकते.

• पतंग अवस्थेतील कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी एकरी किमान 2 प्रकाश सापळे लावावेत.

शेवगा झाडाच्या खोडाजवळील तण काढून घ्यावे, जेणेकरून खोडकिड्याचा प्रादुर्भाव आटोक्यात येऊ शकतो.

• खोडाजवळ मातीचा भर द्यावा, झाडे लहान असतील तर वादळ पावसात झाडे कोलमडू शकतात.

• पावसाळा चालू झाल्यानंतर आठवड्यातून एकदा तरी बुरशीनाशक व हुमिक ऍसिड ड्रीपद्वारे द्यावे किंवा आळवणी करावी.

• तसेच स्पर्षजन्य बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी.

• जास्त पाऊस झाल्यामुळे मुख्य अन्नद्रव्ये व सुष्म अन्नद्रव्ये पाण्यासोबत खाली निघून जातात, त्यामुळे मुळांजवळ त्यांची कमतरता जाणवून, परिणामी झाडाची वाढ खुंटुन पाने पिवळी पडतात व गळून जातात.

• अश्या अवस्थेत, पाऊस काही दिवस जर थांबला असेल, तर सुष्मअन्नद्रव्ये (Micronutrients) व मुख्यअन्नद्रव्ये (NPK) ड्रीप द्वारे द्यावीत.

• नवीन लागवड असेल तर अश्या अवस्थेत झाडे जगविण्याकडे कल असावा. पाऊस थांबल्यानंतर झाडांची नैसर्गिक वाढ होत असते.

• पावसाळ्यात बरेच शेतकरी ड्रीपद्वारे आठवड्यातून एकदा, गोमुत्र , गूळ, गांढुळपाणी देतात, व याचा परिणाम देखील चांगला दिसून आलेला आहे.

• अधिक माहिती साठी ThinkingmindRJ या शेवगा शेतीवरील youtube channel ला भेट द्यावी.


धन्यवाद.

Team ThinkingMindRJ.

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w

Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share

No comments:

Post a Comment

शेवगा शेती नियोजन

 नमस्कार मित्रांनो, पाऊस उशिरा गेल्यामुळे शेवगा शेतीत फुलोरा व सेटिंग उशिरा होताना दिसत आहे. ज्या ठिकाणी मागील 1 महिन्यापासून पाऊस संपलेला आ...