Thursday, September 10, 2020

शेवगा मुळे - झाडाचे आरोग्य

                     ●शेवगा मुळे - झाडाचे आरोग्य.●

शेवगा शेती माहिती


शेवगा झाड हे शेंड्यापासून ते मुळांपर्यंत नाजूक असते. त्यामुळे वातावरणातील बदलांना ते लगेच विविध प्रकारे प्रतिक्रिया देत असतात.


• शेवगा झाडाचा, फांद्यांचा विस्तार, फुले लागणे, शेंगधारणा व शेंगांचा विकास या महत्वाच्या गोष्टी ह्या झाडाच्या मुळांच्या आरोग्यावर अवलंबून असतात यात शंका नाही. यामुळे मुळांना निरोगी राखणे तसेच त्यांना निरोगी राखण्यासाठी लागणारे घटक त्यांच्यापर्यंत वेळोवेळी पोहचवणे हे गरजेचे ठरते.

• मानवांप्रमाणेच शेवगा झाडांनाही विकासासाठी व विस्तारासाठी, पाणी, खाद्य,  व विविध पौष्टिक पदार्थांची आवश्यकता असते.

• शेवग्याचे झाडाचा जमिनीच्या वर होणारा विकास पाहून त्याच्या मुळांचे आरोग्य समजणे सोपे ठरते.

Thinkingmindrj

शेवगा झाडाचे, प्रथमतः एक मुख्य मूळ वाढते, यास सोटमुळ म्हटले जाते. हे मूळ जमिनीत खोलवर जाऊन पोषकद्रव्ये घेण्यास सूरवात करते.

• त्यानंतर आजूबाजूकडील मुळे तयार होतात,  व जमिनीत सर्वत्र पसरतात, ही मुळे जास्तीत जास्त तयार होणे गरजेचे असते. या मुळांस संयुक्त मुळे म्हटले जाते, तसेच पांढऱ्या मुळी देखील संबोधले जाते.

• मातीमधून पाणी आणि पोषकद्रव्ये काढण्यासाठी वापरले जातात. पाणी व विविध अन्नद्रव्ये शोषून घेण्याचे काम, विशेषतः पांढरी मुळे करीत असतात.

• पांढरी मुळे ही निरोगी मुळे असतात व त्यांना बाजूकडील मुळे सर्वात जास्त असतात.

• पांढऱ्या मुळांची संख्या वाढल्याने रोपे निरोगी व एकसारखी दिसतात.

• जेव्हा शेवगा बी लावले जाते, काही दिवसांनंतर ते उगवल्यावर, रोप हे, मुळे तयार करण्यास सुरुवात करते. नवीन तयार झालेले रोप, ह्या मुळांत  सर्वाधिक प्रमाणात ऊर्जेची गुंतवणूक करतात.

• शेवगा झाडाच्या, मुळांच्या विकासावर सिंचनाचा मोठा परिणाम होत असतो.

•शेवग्यामध्ये जास्तीचे पाणी मुळासाठी हानीकारक असते व ते बुरशीच्या प्रति जास्त संवेदनशील असतात.बुरशी ही ओलसर वातावरणात लवकर पसरते. 

• मुळांच्या जवळ पाणी जास्त झाल्यास किंवा पाणी किंवा ओलावा जास्त दिवस राहिल्यास, झाडाची पाने पिवळी पडतात, व गळून जातात. झाडाची वाढ खुंटते.

• तसेच मुळांना बुरशी लागून मुळे तपकिरी रंगाची होतात, बुरशीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर मूळकूज होऊन झाड वाळू शकते.

• त्यामुळे  शेवगा शेती करताना ,मुळांना योग्य प्रमाणात पाणी देणे व पाण्याचा निचरा होणे हे अत्यंत आवश्यक असते.

• मुळांच्या वाढीसाठी हवेची गरज ही तितकीच महत्वाची ठरते.

• झाडाच्या मुळांच्या आजूबाजूची जमीन भुसभुशीत करून घेणे आवश्यक ठरते, त्या द्वारे हवेचे आवश्यक असलेले प्रमाण मुळांना लाभू शकते.

• पावसाळ्यात शेवगा झाडास आठवड्यातून एकदा तरी बुरशीनाशक व हुमिक ऍसिड देणे गरजेचे आहे. जेणेकरून बुरशीजन्य रोग हे मुळांपासून दूर ठेवता येऊ शकतात.

• पावसाळ्यात, मुळांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते.

• शेवग्यात जास्त प्रमाणात होणारी फुलगळ ही अधिक पाण्यामुळे होताना दिसून येते, त्यामुळे फुलोरा अवस्थेत पाणी नियोजन हे काटेकोरपणे गरजेचे आहे. 

• फुलोरा अवस्थेत पाणी कमी देणेच फायद्याचे ठरते. शेवग्यामध्ये पाण्याचे नियोजन की एक कलाच आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

• त्यामुळे पाण्याचा निचरा होणारी जमीन ही शेवग्यास जास्त मानवते. सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा, जेणेकरून मुळांची वाढ व आरोग्य हे चांगले राखून जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल.

• जमिनीत जास्त पाणी साचू देऊ नये. बुरशी नाशक व हुमिक ऍसिड चा वापर हा सातत्याने करावा. शेणखत, गांढुळळखत, लेंडीखातांचा वापर जास्तीत जास्त करावा.

• तसेच जीवामृत किंवा वेस्टडिकम्पोजरचा वापर ही सातत्याने करावा, जेणेकरून जमिनीचे आरोग्य सुस्तीतीत राहून, मुळांचेही आरोग्य उत्तम राहील.


धन्यवाद.

Team ThinkingMindRJ.

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w

Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share

No comments:

Post a Comment

शेवगा शेती नियोजन

 नमस्कार मित्रांनो, पाऊस उशिरा गेल्यामुळे शेवगा शेतीत फुलोरा व सेटिंग उशिरा होताना दिसत आहे. ज्या ठिकाणी मागील 1 महिन्यापासून पाऊस संपलेला आ...