Tuesday, September 29, 2020

सेंद्रिय शेती, सेंद्रिय खते

                    ● सेंद्रिय शेती, सेंद्रिय खते व फायदे ●

सेंद्रिय शेती. Organic Farming

हवा, माती, धान्याची रोपे, पशू, पक्षी, मनुष्यप्राणी व निसर्गचक्र यांचे आरोग्य वाढविणे व निसर्गचक्रात समतोल राखणे, हा सेंद्रिय शेतीचा महत्वाचा उद्देश आहे. 

सेंद्रिय शेती करताना कोणत्याही रासायनिक गोष्टीचा वापर न झाल्यामुळे मनुष्याचे तसेच जमिनीचे आरोग्यास पोषक राहण्यास मदत होते.

सेंद्रिय शेती ही निसर्गाच्या जीवनचक्रानुसार चालणारी अनुरूप शेती असल्यामुळे, जीवसृष्टीला कसलीही हानी न होता, सर्व प्रकारचे प्रदूषण होणे टाळता येते.


• प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते, त्याला सेंद्रिय खत असे म्हटले जाते.

Thinkingmindrj

• सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते खालील प्रमाणे:-


- शेणखत, 

- कंपोस्ट, 

- हिरवळीची खते, 

- गांडूळ खते, 

- माश्यांचे खत, 

- खाटिकखान्याचे खत, हाडांचे खत, 

- कोंबडी खत,

- लेंडी खत,

- तेलबियांची पेंड इत्यादी.


• शेणखत : 

- गाईचे / म्हशीचे शेण, मूत्र, तसेच गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हटले जाते.

- शेणखतामध्ये नत्र, स्फुरद व पालाश हे मुबलक प्रमाणात असते.

- शेणाचा महत्त्वाचा उपयोग बायोगॅसमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणून वापरता येते.


• कंपोस्ट खत :-

- शेतातील गवत, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, उसाचे पाचट, कापसाची धसकटे इ. सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्मजीवजंतूंमुळे विघटन होऊन त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट म्हणतात. यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश मुबलक प्रमाणात आढळते.


• हिरवळीची खते :- 

- हिरवळीचे खाते म्हणजे,  लवकर वाढणाऱ्या पिकांची निवड करून, त्यांची दाट पेरणी करून पीक फुलोऱ्यावर येण्याच्या आधी ते नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाढली जातात.

- त्यापासून जमिनीला नत्र मिळते, जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते. या पद्धतीने तयार केलेल्या खतांना हिरवळीचे खते असे संबोधले जाते.

- या गाडलेल्या पिकांना कुजण्य़ासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालवधी लागू शकतो.

- यामध्ये ताग, धैच्या, मूग, चवळी, गवार, शेवरी, बरसीम, ग्लीरिसिडीया तागापासून नत्राचा पुरवठा ५ ते ६ आठवड्यात चांगल्या प्रमाणात होतो.

- मुगाचा पालापाचोळा जमिनीत गाडल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ होताना दिसून येते.


• गांडूळ खत :- 

- ह्या खतात गांडुळाची विष्ठा, नैसर्गिकरीत्या कुजलेले पदार्थ, गांडुळाची अंडीपुंज, बाल्यावस्था आणि अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असतो, या खताला गांडूळ खत असे म्हणतात.


• माशाचे खत :- 

- समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून जे खत तयार होते ते. ह्यात नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण भरपूर असते.


• खाटीकखान्याचे खत :- 

- खाटीकखान्यात जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवितात त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात यात नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणत असते. 

● सेंद्रिय शेतीचे फायदे.

• जमिनीत सेंद्रिय खत टाकल्यास नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थांत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. शेणखताव्यतिरिक्त कोंबडी खत, रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात.

• मातीचा आरोग्य स्तर कायम ठेवण्यास मदत.

• शेतीवर अवलंबून असणार्‍या जीवांना, नैसर्गिक जीवन जगण्याचा हक्क हा सेंद्रिय शेतीमुळे मिळतो.

• सेंद्रिय शेतीमुळे अन्न सुरक्षेची खात्री व जीवनमान उंचावण्यास मदत होते.

• आर्थिक उत्पनात वाढ व खर्चात घट होते, त्यामुळे शेतीचे आर्थिक नियोजन हे योग्यरितीने होते.

• जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते.

• वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास, जमिनीची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते.


• सेंद्रिय खतांमुळे झाडांना विविध अवस्थेत नैसर्गिक नत्र, स्फुरद व पालाश उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांद्वारे उत्तम प्रकारे शोषले जाते.

• जमिनीचा सामुचा समतोल राखला जातो.

• सेंद्रिय खतांच्या नियमित वापरामुळे, मातीवर नैसर्गिक आच्छादन तयार होते, त्याची सावली होऊन तापमान वाढत नाही.

• कर्ब किंवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने, जमिनीतील असंख्य जिवाणूंना त्याचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी होतो, व हे जिवाणू जमीनीतून अन्नद्रव्य झाडांना सहजतेने उपलब्ध करुन देतात.


• सेंद्रिय शेती करताना, वनस्पतींपासून विविध निविष्ठा तयार करून त्या किटनाशकाचा स्वरूपात वापरता येतात. तसेच हानिकारक कीटकांना शेतीपासून दूर ठेवण्यास मदत होते.

• निम तेल, गोमुत्र, करंज तेल, लसूण तेल इत्यादी घटकांपासून सौम्य ते तीव्र प्रकारचे किटनाशक तयार करता येऊ शकते.

• तसेच पक्षी थांबे,  चिकट सापळे, कामगंध सापळे,  प्रकाश सापळे वापरून होणार संभाव्य प्रादुर्भाव रासायनिक घटक न वापरता, टाळता येऊ शकतो.


धन्यवाद.

Team ThinkingMindRJ.

YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w

Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share


No comments:

Post a Comment

शेवगा शेती नियोजन

 नमस्कार मित्रांनो, पाऊस उशिरा गेल्यामुळे शेवगा शेतीत फुलोरा व सेटिंग उशिरा होताना दिसत आहे. ज्या ठिकाणी मागील 1 महिन्यापासून पाऊस संपलेला आ...