नमस्कार मित्रांनो,
पावसाळा चालू आहे, महाराष्ट्रातील बऱ्याच भागात सतत धार पाऊस आहे, तसेच काही भागात आठवड्यातून 3 ते 4 वेळा पाऊस पडत आहे.
अश्या प्रकारचे पर्जन्यमान हे शेवगा पिकास मानवत नाही.
Thinkingmind टीम नेहमी यावर मार्गदर्शन करत आहे की, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन शेवग्यास मानवते, लागवड करण्याअगोदर जमीनीचा व आपल्याकडील पर्जन्यमानाचा अंदाज घेणे गरजेचे असते.
जून,जुलै आणि ऑगस्ट मधील शेवगा लागवडीस या पावसाचा फटका बसलेला दिसत आहे..
झाडाची वाढ खुंटने, पानगळ, पाने पिवळी पडणे, मूळकूज होऊन रोप कोमेजून जाणे, रोप वाळणे, पूर्ण पानगळ होऊन फक्त काढ्या उभ्या राहणे इत्यादी...समस्या दिसून येत आहेत.
आपण मागील काही व्हिडीओ मध्ये सांगितलेले आहे की, आठवड्यातून एकदा तरी बुरशीनाशक व हुमिक ऍसिड ची आळवणी करावी किंवा ड्रीप द्वारे द्यावे.
फक्त एवढी उपाययोजना करून, आपण सध्या रोपे वाचविण्याचे ध्येय ठेवावे, असे मला वाटते.
अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही, ज्या रोपाच्या काड्या दिसत आहेत,त्याला पुन्हा हिरवी पालवी , फुटवे फुटणार आहेत. संयम ठवून काम करावे.
बुरशीनाशकामध्ये SAAF ही पावडर वापरण्याचा आपण सल्ला देतो,कारण यात दोन बुरशीनाशके आहेत, मुळांना झालेला बुरशीचा प्राथमिक व अति प्रमाणात झालेला प्रादुर्भाव यामुळे आटोक्यात येतो.
संयम ठेवावा, पाऊस निवळून, ऊन पडल्यावर तुम्हाला नवीन फुटवे दिसतील, व उत्साह वाढेल यात शंका नाही.
बाकी शेवगा शेती संदर्भात सर्वतोपरी मदत करण्यास ThinkingMindRJ टीम नेहमी तुमच्या सोबत आहेच.
धन्यवाद.🙏
Team ThinkingMindRJ.
YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w
Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share
No comments:
Post a Comment