● निंबोळी अर्क - शेवगा शेती ●
• शेवग्याच्या झाडावर होणाऱ्या विविध अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यास निंबोळी अर्क कामी पडतो.
• कडूलिंबाचे झाड हे आपल्याकडे सर्वत्र आढळून येते. या झाडाचे पान, फळ, डिंक, साल, मूळ यात अनेक औषधी गुणधर्म आहेत.
• कडूलिंबाच्या पानांचा रस आणि गोमुत्र एकत्र करून विविध प्रकारच्या अळ्याच्या प्रादुर्भाव आटोक्यात आणता येऊ शकतो, या संदर्भातील व्हिडीओ आपल्या Youtube channel - ThinkingMindRJ उपलब्ध आहे.
• कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले 'ॲझाडिराक्टीन' हा घटक कीटकनाशकाचे काम करते. म्हणून निंबोळी अर्क हे एक उत्कृष्ठ किड प्रतिरोधकाचे काम करते.
• निंबोळी अर्क म्हणजे कडुलिंब या झाडाच्या बियांपासून (निंबोळ्या / निंबोण्या) काढलेला अर्क असतो.
• 'ॲझाडिराक्टीन' या घटकाचे प्रमाण हे, निंबोणीच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते.
• निंबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा शेवगा व तसेच इतर पिकांवरील बऱ्याच किडींवर परिणामकारक आहे.
• शेवगा झाडावर पडणारे रोग काही रोग महणजे.. मावा, पाने गुंडाळणारी आळी, पाने खाणारी आळी, तुडतुडे, खोडकिडा इत्यादींवर निंबोळी अर्क प्रभावशाली ठरतो.
• इतर पिकावरील काही प्रादुर्भाव म्हणजेच, अमेरिकन बोंड अळ्या, तुडतुडे पाने पोखरणाऱ्या व देठ कुरतडणाऱ्या अळ्या, फळमाश्या, भुंगेरे, खोडकिडा आदी अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो व त्यांचा बंदोबस्त होतो.
• निंबोळी अर्क घरी कसा तयार करण्यासाठी विविध पद्धती अवलंबल्या जातात.
• यातील प्रचलित पद्धत म्हणजे,
- कडुलिंबाच्या झाडाखालाल निंबोळ्या वेचून घेतल्या जातात.
- निंबोळी वरील साल काढून त्या उन्हात वाळवतात.
- अंदाजे ५० ते ६० ग्रॅम निंबोलीच्या वाळलेल्या बिया घेऊन त्याची बारीक पूड / पावडर तयार केली जाते.
- त्यानंतर ही पावडर/पूड एका कपड्यात बांधून ठेवली जाते.
- नंतर हा पावडर बांधलेला कपडा एक लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवतात.
- यामुळे निंबोळीचा अर्क हा पाण्यात उतरतो.
आणि मग हा अर्क विविध पिकांवर फवारणीसाठी वापरून विविध किडींचा बंदोबस्त केला जातो.
- निंबोळी अर्क हा आंतरप्रवाही असतो, त्यामुळे हा झाडाच्या सर्व भागांमध्ये पोहोचतो.
- फवारणी ही संध्याकाळी केली तर अधिक फायदा होताना दिसून येतो.
• अंदाजे ५ लिटर निंबोळी अर्क १०० लिटर पाण्यात घ्यावा.
• या १०० लिटर पाण्यात अंदाजे गरजेनुसार १०० ग्रॅम अंघोळीचा किंवा कपड्याच्या साबणाचा चुरा टाकावा, किंवा याची पेस्ट तयार करून टाकावी.
नंतर हे मिश्रण चांगले ढवळून घेऊन फवारणीसाठी वापरावे.
• कमी खर्चातील, हानिकारक रसायनमुक्त, व प्रभावशाली हे औषध आहे. महाराष्ट्रातील बरेच शेतकरी या नैसर्गिक किटनाशकाचा वापर करत आहेत.
• अश्या किटनाशकाचा वेळोवेळी वापर केल्याने,पिकांवर पडणारे विविध किडी आपण आटोक्यात आणू शकतो, तसेच शेतीवर होणार खर्च ही कमी करू शकतो.
धन्यवाद.
Team ThinkingMindRJ
YouTube channel - https://www.youtube.com/channel/UClrzu1cvQt2oQhdr8-cfB3w
Facebook Group - https://www.facebook.com/groups/1935581189829806/?ref=share
खूप छान माहिती 🚩
ReplyDelete